मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

फिर जिंदगी ----जिंदगी भर लक्षात ठेवावा असा चित्रपट ... --- सीमा


फिर जिंदगी.... जिंदगी भर ...लक्षात ठेवावा  असा चित्रपट...
----सीमा
-------------------------------------------------------------------------------------------------------------
कलाकार - नसरुद्दिन शहा, रत्ना पाठक शहा, नीरज कबी, अमृता सुभाष, विक्रम गोखले, ज्योती सुभाष, उत्तरा                 बावकर ,संदेश कुलकर्णी
कालावधी - फक्त ५५  मि.

प्राज फौंडेशन च्या सहकार्याने , ZTCC पुणे  यांनी प्रदर्शित केलेला
म्हणजे जिंदगी भरच नाही तर जिंदगी के द बाभी ... इतरांनी लक्षात ठेवावा असा हा फक्त ५५ मिनटांचा हा
चित्रपट......

या माहितीपटाची मूळ लेखन , कथा व चित्रपट संवाद सुमित्रा भावे या दिग्गज लेखिकेचे आहेत. तसेच दिग्दर्शन व त्याचे संकलन  सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर यांचे आहे.
कलाकार, चित्रपट कथा, आणि एकूणच तांत्रिक दृष्ट्या हा माहितीपट पहिल्यापासून मनाची पकड घेणारा आहे.
     रत्ना पाठक शहा  व नसरुद्दिन शहा, विक्रम गोखले, अमृता सुभाष  ज्योती सुभाष  यांसारख्या दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
उत्कृष्ट कथा, चित्रपट संवाद, संकलन, सामाजिक आशय असलेला व  तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा हा चित्रपट
बघण्यासाठी वेळ जरूर काढा.
अवयव दानाबद्दल असलेले समज , गैरसमज दूर करण्यात आणि समाजप्रबोधन करण्यात हा चित्रपट
शत प्रतिशत यशस्वी झाला आहे खरा  पण हा चित्रपट बघून अवयव दान करायला  समाजातील अनेक
जण पुढे येतील तेंव्हाच खऱ्या अर्थाने या चित्रपटाचे  यश असेल...
शेवटी जाता जाता  आपले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते  विंदा करंदीकर यांची कविता हा चित्रपट  पाहताना मला आठवली.
देणाऱ्याने घेत जावे , घेणाऱ्याने  घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे....

अत्यंत सुंदर चित्रपट... अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. ...
(खाली दिलेल्या PHIR ZINDAGI ) या शब्दावर mouse चे बटन नेऊन click करा की लिंक येईल त्यावर click करा, लगेच चित्रपट चालू होईल. )

PHIR ZINDAGI






रविवार, ६ डिसेंबर, २०१५

बाद.... (Outdated)....

बाद.... outdated.... - by Seema


एका वेब जर्नालिझम च्या क्लास मध्ये एक व्याख्याता, भविष्यातील मिडिया चे महत्व, वेब पत्रकारितेला आलेले चांगले दिवस आणि भविष्यकाळातील ह्या माध्यमांसाठी निर्माण होणारी स्पर्धा यावर माहिती देत होते.  त्यांनी सांगितले कि यापुढे ह्या क्षेत्रात यायचे असेल तर  उत्कृष्ट बोलू, लिहू शकणारे व
जे तंत्रज्ञानात निष्णात असतील, म्हणजेच जे अष्टपैलु असतील त्यांना खूप संधी असतील. आजकाल परदेशात मेडिया चे शिक्षण घेऊन येऊन माध्यमांमध्ये इतर भाषिक बरेच तरुण नोकरी करत आहेत. त्यामुळे आता  मराठी मुलांना अनेक स्पर्धक या क्षेत्रात  आहेत. आणि तुम्ही जर वयाने ४०-५० मध्ये असाल व तुमचा स्वतःचा ब्रांड नसेल तर तुम्ही बाद ... झालात.
असं सातत्याने लागोपाठ दोन लेकचर मध्ये ऐकावे लागले आणि नकळत मनात आपण प्रौढ दिसायला लागलो
याची जाणीव झाली आणि एक मानसिक धक्का बसला. ...
खरतर धक्का बसण्याचे काही कारण नव्हते... पण काल पर्यंत सर्वजण तू  किती तरुण दिसतेस असं काहीसं म्हणणारे  आज एकदम मला बाद .. करतात. बऱ्याच जणांच्या बाबतीत नेहमी उलट असंत, वयापेक्षा मोठी दिसणारी माणस आपल्या आजूबाजूला खूप आढळतात. ...
पण आता आपलं वय दिसू लागलं हे कुठेतरी मनात सुखावलं... कारण चला  निदान आपल्या वयाचा मान ठेवून तरी आता आपल्याकडून काही गोष्टींची अपेक्षा केली जाणार नाही, आपल्याला गृहीत धरलं जाणार नाही ... असं वाटलं.
पण वस्तुतः हे मान्य करावाच लागेल कि तंत्रज्ञानात  वेगाने होणाऱ्या बदलामुळे आम्हीच काय, आजची
तरुण पिढी सुद्धा जर त्या वेगाने धावली नाही तर लवकरच बाद होईल....
गेल्या काही वर्षात  झपाट्याने होणाऱ्या बदलांना सर्वानाच सामोरे जावे लागणार आहे, स्वीकारावे लागणार
आहे. ...  हे खरेच
आपण बाद झालो हे काही मनाला पटेना, आणि विचार करता करता लक्षात आलं  खरतर प्रत्येक गोष्ट हि
काही काळाने बाद होत असतेच कि..
आता हेच पहा ना, पूर्वी चाळी होत्या त्या बाद झाल्या आणि सोसायट्या उभ्या राहिल्या, आता गगनचुंबी
इमारती उभ्या राहत आहेत. ...
पूर्वी ची शिक्षण पद्धती जाऊन आता विद्यार्थी संगणकावर ऑन लाईन शिकत आहेत. .. पूर्वी तासन तास चालणाऱ्या बुद्धिबळाच्या स्पर्धांची जागा जलद स्पर्धांनी घेतली आहे.
मौल्यवान समजणाऱ्या जुन्या दागिन्यांची जागा सुद्धा नवीन दागिन्यांनी घेतली आहे. ...
 आम्हाला बाद ठरवणारी आजची तरुण पिढी पाय घट्ट रोवून किती काळ उभी राहील ? आपली मूल्य किती
टिकवून ठेवेल ? का आजच वेळ आहे त्यांना समजावण्याची कि तंत्रज्ञानाच्या पाठी धावताना ... जुन्या पिढीकडे जरा मागे वळून बघा , शाश्वत जीवनशैली ते कसे जगत होते ते अभ्यासा  नाहीतर...
तुमच्या नंतरची पिढी तुम्ही तिशीत जाईपर्यंत तुम्हाला outdated... बाद ठरवेल.... कारण काही झाल तरी
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात... आणि प्रत्येक गोष्ट कधीतरी outdated... बाद होतचं ... असते.
घरातल्या कागदाचं digitalization करायचं ठरवलं आणि समोर प्रशस्तीपत्र आलं ते वडलांना मिळालेल्या
राज्य पुरस्काराच... अभिमान वाटला आणि त्या अनुषंगाने मनात विचार आला....की
जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती हि बाद .. होतच असते... पण तिने जर तिच्या आयुष्यात काही कार्य केले असेल आणि त्या संबंधीची काही माहिती, कागदपत्रे  असतील तर ह्याच तंत्रज्ञानामुळे आपण ती जतन करू शकतो .. कारण ती पुढल्या पिढीसाठी देन असते... त्यांच्यासाठी ते प्रेरित ठरू शकत...

तेंव्हा तरुणानो लक्षात ठेवा .... . जु नं ते सो नं  हे पण खर ....



तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...