रविवार, २९ मे, २०१६

पर्यावरण हा आवडीचा वा सवडीचा विषय राहिला नसून गरजेचा विषय झाला आहे... संगीता जोशी.....

 पर्यावरण दक्षता मंच या ठाणे स्थित संस्थेच्या संचालिका संगीता जोशी यांच्या व्याख्यानाला जाण्याचा योग आला. सुमारे १५ वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था आज पर्यावरण या विषयात विविधांगी कामे करत आहे.
आजपर्यंत या क्षेत्रात त्यांनी शिक्षण, संशोधन व पर्यावरण जागरूकता करून हा विषय गरजेचा कसा आहे आणि आपल्या जवळचा कसा आहे हे अतिशय सोप्या, रंजक व दैनंदिन उदाहरणावरून समजावून दिले. संस्थेचे एक संचालक श्री. विद्याधर वालावलकर यांनी ठाणे येथे वाह्तुकीवरून होणारे प्रदूषण किती आहे याचा अभ्यास केला आहे व त्याचा अहवाल महानगरपालिकेकडे दिला आहे हे सांगितले.
ही संस्था ठाणे, मीरा-भायंदर येथील सुमारे २५०० रुग्णालयातील बायो मेडीकल कचरा गोळा करून त्याचे व्यवस्थापन करते असे सांगितले. तसेच गेली १२ वर्षे सर्व वयोगटातील लोकांसाठी पर्यावरण शाळेचे आयोजन करते. शाळा म्हणजे पर्यावरण विषयाबाबत साक्षरता निर्माण करते.
शहरी पर्यावरण व ग्रामीण पर्यावरणाचे प्रश्न पूर्णतः; वेगळे आहेत. हे सांगताना त्यांनी   कल्याण मुरबाड रोड वर असलेल्या  मामनोली गावाचा उल्लेख केला. तिथे त्यांनी बिया, वृक्ष तसेच औषधीय वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन करणारे एक संशोधन केंद्र सुरु केले आहे.
तसेच ग्रीन शॉपिंग या माध्यमातून वेगवेगळ्या २५  सामाजिक संस्थां ज्या आज ग्रामीण उद्योगाशी संबंधित
आहेत अशा   उद्योजकांचा माल शहरापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी त्यांच्याशी बांधिलकी निर्माण केली आहे.
हा माल शहरापर्यंत पोचवून वेगवेगळ्या प्रदर्शनातून त्यांची विक्री करण्याचे देखील काम या संस्थेमार्फत केले
जाते. त्यासाठी काही संस्था किंवा व्यक्तींना ह्यात समाविष्ट केले जाते.
कचऱ्याचे व्यवस्थापन
देवनार डम्पिंग ग्राउंड , त्यानंतर हरी ओम नगर यांची कचरा व्यवस्थापनाची क्षमता आता संपली असून भविष्यकाळात कचऱ्याचे व्यवस्थापन हे अत्यंत गंभीर व महत्वाचे ठरणार आहे असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने त्यांनी अनेक प्रयोगानी तयार केलेल्या जादूच्या बादली (magic bucket) चा वापर केला पाहिजे हे सांगितले. ओला कचरा व सुका कचरा याचे व्यवस्थापन आपण कसे करून शकतो हे सांगतानाच ती magic
bucket तयार करण्याचे प्रशिक्षण सुद्धा संस्था देते. ते bucket विकत घेण्यापेक्षा आपण स्वतः ते तयार केले तर
त्याचे महत्व व उपयुक्तता अधिक प्रमाणात होईल असे सांगितले.
सदाहरित  जगण्याचे   व्यवस्थापन (Green Living Consultancy) :
ह्या विषयांतर्गत पाण्याचे व्यवस्थापन, घन कचरा व्यवस्थापन, उर्जा स्त्रोतांचे व्यवस्थापन आणि रोपांचे संगोपन व संवर्धन हे सर्व ज्यात येते ते आरोग्याचे व्यवस्थापन याची थोडक्यात माहिती त्यांनी उदाहरणाद्वारे स्पष्ट केली.
जमिनीतील पाण्याचा साठा  ही आपली पाण्याची बँक आहे त्याचे संवर्धन केले तर भविष्यकाळात आपण पाणी समस्येवर तोडगा काढू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्याकडे एक sauce ची बाटली टेस्टिंग साठी आली होती. त्यातील sause काही केल्या विघटन होत नव्हता म्हणजे त्या बाटलीतील sause मध्ये रासायनिक द्रव्याचा वापर केला होता. जाहिरातींद्वारे दाखवण्यात येणारे
sause, jam, junk food यात असणाऱ्या रासायनिक घटकांचा वापर व त्यामुळे होणारी शरीराची हानी त्यांनी विषद केली.
पूर्वी राम मारुती रोड, ठाणे या रस्त्यावर अनेक जांभळाची झाडे होती. पण त्या झाडावर जांभळे येणे बंद झाली. ती का झाली याचा शोध घेतला मधमाश्यांची पोळी नाहीशी झाल्यामुळे झाडाला फळे येण्याचे बंद झाले.
म्हणजेच निसर्गातील प्रत्येक घटक महत्वाचा असतो  याची जाणीव त्यांनी उपस्थिताना करून दिली.
आपण सध्या डास खूप वाढले आहोत असे म्हणतो. पूर्वी डास हे दलदलीच्या ठिकाणी जास्त असायचे. आता आपण शहरीकरणामुळे दलदलीच्या जवळ गेलो आहोत परिणामी आपण डासांच्या परिसरात आहोत असा उलेख त्यांनी केला. डासांना मारण्यासाठी आपण हिट वापरतो त्याचा परिणाम आपल्या श्वसनयंत्रणेवर  पण होत असतो पण हे आपल्या लक्षात येत नाही. असे देखील त्यांनी सांगितले.  अभयारण्यातून काढलेल्या रस्त्यांमुळे होणारे प्राण्याचे अपघात, घुसखोर कोण - ? बिबट्या कि माणूस ? असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सांगतानाच आजोबा हा पर्यावरण विषयक चित्रपट आवर्जून पाहावा असा उल्लेख त्यांनी केला. तसेच त्यांनी
Garbage in Pacific ocean या चित्रपटाचा देखील उल्लेख केला.
पशुंवरील उपचारांसाठी वापरले जाणारे डायक्लोफेनेक हे औषध  वापरले जाते. परंतु  जनावरे जेंव्हा मृत होतात तेंव्हा गिधाडे ह्या मृत जनावरांना खातात. ही गिधाडे जेंव्हा मृत जनावरे खातात, तेंव्हा
त्यांच्यातील महत्वाच्या अवयवात युरीक  acid चे खडे तयार होतात हे युरीक acid बाहेर टाकता न आल्याने हि गिधाडे मारतात. हे औषध विघटक होत नसल्याने गिधाडांच्या शरीरात विष तयार होते. हे सांगतानाच त्यांनी विको नारायणी मध्ये सुद्धा ह्या ह्या औषधाचा वापर होत असल्याचे सांगितले.
कचऱ्याचे व्यवस्थापनाचे कसे करावे ह्याचे मार्गदर्शन आम्ही गृहनिर्माण मंडळांमध्ये जाऊन करतो त्यामध्ये सुद्धा आम्ही तिकडल्या कचरेवाल्यांना सुद्धा ह्याचे प्रशिक्षण देतो असे सांगितले.
हिमाचल प्रदेश हा पूर्णपणे प्लास्टिक मुक्त प्रदेश झाला आहे हे सांगतानाच, श्री. रामदास कोकरे ह्या मुख्याधिकारी यांनी दापोली शहर प्लास्टिक मुक्त केले आहे. हे सांगितले.  प्रत्येकाने स्वतःच्या प्रयत्नातून, लोकशिक्षणातून तसेच ध्यास घेऊन लोकप्रतिनिधीना सहभागी करून जर काम केले तर सर्व काही शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी उपस्थितांच्या प्रश्नाचे, शंकांचे समाधान त्यांनी केले.
एकंदरीतच अतिशय सोप्या, साध्या व रोजच्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांनी त्यांनी पर्यावरण रक्षण गरजेचे कसे आहे हे सांगून  साक्षर केले.
संस्थेचे नाव : पर्यवरण दक्षता मंच
                    शॉप नं. १५, दादोजी कोंडदेव स्टेडीअम
                   खरतान रोड, ठाणे (पश्चिम )
दूरध्वनी :    ०२२-२५४११६३३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...